- रात्रीच्या वेळी जमीन थंड होताच तिच्याजवळ
असणारी हवेतील वाफही थंड होते. त्याबरोबर
या वाफेचे रूपान्तर पाण्यात होऊन ती जवळ-
च्या वस्तूवर साचते. खडक, जमीन, वनस्पती,
छप्पर यांवर पाण्याचा पातळसर थर साचून
राहतो. पानांवर पाणी थेंबांच्या रूपात साचते.
आपण त्यांना 'दवबिंदू ' असे म्हणतो. ' दव
पडले ' असे आपण म्हणतो ते बरोबर नाही.
दव साचले असेच म्हटले पाहिजे.जमिनीवरील
थंड वस्तूंवर ते रात्रभर राहते. सूर्योदयाबरोबर
पानांवर ते चकाकू लागते. सूर्य वर येताच
वस्तू तापतात आणि त्यावरील दवाची वाफ
होते. रात्र होताच हवेतील थंडाव्यामुळे या
वाफेचे दव बिंदू होतात. दव निर्माण होण्यासाठी
हवेत उबदार आर्द्रता असावी लागते. अशी
हवा थंड पृष्ठभागाच्या सान्निध्यात असावी
लागते. दव बिंदू पाने, गवत यांवर दिसते.
त्यावर स्टार्चची क्रिया केली जाते. त्यामुळे
कापड कडक बनते. असे नवे कापड जेव्हा
आपण पाण्यात टाकतो. तेव्हा त्यावरचे स्टार्च
निघून गेल्याने कापडाचे धागे सैल होतात व ते
एकमेकांच्या जास्त जवळ येतात.
कापडाचे धागे एकमेकांच्या जास्त जवळ
आल्याने कापड आक्रसते.
जि.प प्रा.शाळा बांडीकुहेर
ता.साक्री जि.धुळे
९४२२७३६७७५