माझ्या ब्लॉगवर मी श्री.शंकर चौरे आपले स्वागत करत आहे,ब्लॉग अपडेट करण्याचे काम चालू आहे..

Wednesday 23 May 2018

पाणी वाचवण्याचे सोपे उपाय

--------------------------------------------------

(१)नळ वाहते ठेवू नका. उपयोग करून
    झाल्यावर नळ बंद करा.

(२)नळात काही दोष असेल तर तपासून
  घ्या आणि गळणा-या नळांची ताबडतोब                                     दुरूस्ती करून घ्या.

(३)पिण्याचे स्वच्छ पाणी भांडी घासण्यासाठी
    किंवा कपडे धुण्यासाठी वापरू नका.

(४)रात्रभर साठलेले पाणी दुसर्‍या दिवशी
    वापरण्यासाठी सुरक्षित असते. ते फेकून
    देऊ नका. जास्त वेळ साठवलेले पाणी
   भांडी घासण्यासाठी, स्वच्छतेसाठी,
   बागकामासाठी वापरता येईल.

(५)दात घासताना नळ वाहता ठेवू नका.
    भांड्याचा उपयोग करा.

(६)अंघोळ करताना बादलीत पाणी घ्या.
     शाॅवरमधून पाणी घेऊ नका किंवा
    बाथटबचा वापर करू नका.

(७)फळे -भाजीपाला धुण्यासाठी वापरलेला
    पाण्याचा उपयोग झाडांना घालण्यासाठी
    करा.

(८)हिरवळीला पहाटे लवकर पाणी घाला.
  ज्यामुळे बाष्पीभवनामुळे उडून जाणाऱ्या
  पाण्याचे प्रमाण कमी होईल.
   
(९)तुमच्या घरासमोरील रस्ता, गॅरेज किंवा
   फुटपाथ पाण्याने धुवून काढण्याऐवजी
  झाडून घ्या.

(१०)शेताला एकदम पाणी देण्यापेक्षा
    ठिबक सिंचन पध्दतीचा उपयोग करा.
--------------------------------------------------
संकलक :- शंकर सिताराम चौरे(प्रा.शिक्षक)
             पं. स. साक्री, जि. धुळे
             📞 ९४२२७३६७७५

Tuesday 22 May 2018

पर्यावरण उपक्रम:-" पालापाचोळा कचरा नव्हे "

  घराभोवती बाग असेल, तर त्या झाडांचा
पालापाचोळा जमिनीवर गळणारच.
वाळक्या फांद्या कधी वा-या वादळानं तुटून
खाली पडणारच. बरेचसे बागवान हा सगळा
'कचरा कुंपणाबाहेर फेकून देतात. मुळात
ह्याची काही आवश्यकता नाही. पालापाचोळा
हा कचरा नाहीच. ते झाडांचं अन्न आहे !
झाडांना ते परत द्या. स्वच्छतेची फारच हौस
असेल, तर झाडून गोळा केलेला पालापाचोळा
एका कुजखड्डयात साठवा. पावसाळ्यात
त्याचं छान खत होईल. किंवा झाडांच्या
बुंध्यापाशी पाचळण(मलचिंग)करा. तिथेच
त्याचं छान खत होईल. जमीन झाकलेली
राहिल्याने पाण्याची वाफ कमी होईल- ते
वाचेल. ह्यातून सार्वजनिक स्वच्छता -
व्यवस्थेवरचा भार कमी होईल. हाही आणखी
एक लाभ.
    
संकलन :- शंकर सिताराम चौरे(प्रा.शिक्षक)
                पं.स.साक्री जि.धुळे
               📞 ९४२२७३६७७५

Thursday 17 May 2018

चला माहिती मिळवूया - वटवाघूळाची


   वटवाघूळ हा एक निशाचर प्राणी आहे.
त्याचे शरीर मऊ केसांनी आच्छादलेले असते.
त्याचा रंग पांढरा, लाल, तपकिरी, करडा किंवा
काळा असतो. वटवाघूळाचे पंख खूप मोठे
असतात. पाठीच्या व पोटाच्या कातडीचा
विस्तार होऊन त्याचे पंख तयार झालेले
असतात.
    वटवाघळे संधिप्रकाशात व रात्रीच्या वेळी
क्रियाशील असतात व दिवसा झोपतात. खाली
डोके वर पाय अशा अवस्थेत ती फांद्यांना
टांगून घेतात. फांद्यांना चिकटून राहण्यासाठी
त्यांच्या मागच्या पायांची रचना वेगळी असते.
त्यांच्या पायांची  बोटे आतल्या बाजूला वाकलेली
असतात व नखे इतकी वाकडी असतात, की
झोपेतही ती झाडावरून खाली पडत नाहीत.
वटवाघळे कीटकभक्षक असतात. शेतातील
पिकांवरील कीड खाऊन पिकांचे होणारे नुकसान
टाळतात.

 संकलन :- शंकर सिताराम चौरे (प्रा. शिक्षक)
               पं.स.साक्री, जि. धुळे
               ९४२२७३६७७५

Tuesday 8 May 2018

आपल्या मनातील कुतूहल

( मनातील प्रश्न व त्यांची उत्तरे )
-------------------------------------------------

(१)एक मोजपट्टी आणि दोरी यांच्या साहाय्याने
     चेंडूचा परीघ कसा मोजाल ?

उत्तर - चेंडूच्या मध्यभागाभोवती दोरी गुंडाळावी
        लागेल. जेवढी दोरीची लांबी होईल, तेवढा
         चेंडूचा परीघ असेल.
--------------------------------------------------
(२) प्राचीन काळी हत्तीचे वजन कसे करत
      असतील  ?

उत्तर - एखाद्या मोठ्या होडीत हत्तीला उभे करून,
       होडी कुठपर्यंत पाण्यात बुडते याची नोंद
       नावेवर करत. त्यानंतर होडीवरील त्याच
       नोंदीपर्यंत बुडायला किती वस्तूमानाचे दगड
      लागतात ते ठरवून हत्तीचे वजन करत.
--------------------------------------------------
(३) मालमोटारींमध्ये भरून आणलेले ऊसाचे
     वस्तुमान कोणत्या एककात नोंदवतात  ?

उत्तर - वस्तुमान टनामध्ये किंवा क्विंटलमध्ये
         मोजतात.
--------------------------------------------------
 संकलक :- शंकर सिताराम चौरे(प्रा.शिक्षक)
                पिंपळनेर ता. साक्री, जि. धुळे
                📞९४२२७३६७७५

Thursday 3 May 2018

पाण्याला जीवन म्हणतात...


 पाणी म्हणजे जीवन !  ' जीवन ' या नावातच
पाण्याचे महत्त्व दडलेले आहे. पाणी ही
आपल्याला निसर्गाकडून मिळालेली भेट आहे.
त्यामुळे पुष्कळ वेळा आपल्याला त्याची किंमत
कळत नाही आणि मग आपल्याकडूनच
पाण्याचा अपव्यय होतो. पाणी फार मौल्यवान आहे,
 ते जपून वापरले पाहिजे.
    पाणी नसेल तर काय होईल,याची कल्पना
दुष्काळातच येते. तहान लागली असताना
पाणी मिळाले नाही की, डोळ्यात पाणी उभे
राहते ! खेडोपाडी पाण्यासाठी लोकांना डोक्यावर
हंडे, कळश्या घेऊन अनेक मैल हिंडावे लागते.
पाण्याविना शेती फुलत नाही.
   आता जगात सगळीकडे पाण्याचा प्रश्न उभा
आहे. कारण पृथ्वीवरील माणसांना आवश्यक
आहे,  एवढा पाण्याचा साठा उरला नाही.
पृथ्वीच्या पोटातील पाण्याची पातळी खालावत
आहे. आकाशातून पडणारे पावसाचे पाणी
जमिनीत मुरवण्याचा प्रयत्न हा पाणीसंचयाचाच
भाग आहे. पाणी आपण वाचवले पाहिजे. ते
जमिनीत मुरवले पाहिजे. तरच यापुढे माणसाचा
टिकाव लागणार आहे.

 संकलन :- शंकर सिताराम चौरे (प्रा. शिक्षक)
               जि. प. प्रा. शाळा बांडीकुहेर
               ता. साक्री, जि. धुळे
                📞  ९४२२७३६७७५