माझ्या ब्लॉगवर मी श्री.शंकर चौरे आपले स्वागत करत आहे,ब्लॉग अपडेट करण्याचे काम चालू आहे..

Thursday 3 May 2018

पाण्याला जीवन म्हणतात...


 पाणी म्हणजे जीवन !  ' जीवन ' या नावातच
पाण्याचे महत्त्व दडलेले आहे. पाणी ही
आपल्याला निसर्गाकडून मिळालेली भेट आहे.
त्यामुळे पुष्कळ वेळा आपल्याला त्याची किंमत
कळत नाही आणि मग आपल्याकडूनच
पाण्याचा अपव्यय होतो. पाणी फार मौल्यवान आहे,
 ते जपून वापरले पाहिजे.
    पाणी नसेल तर काय होईल,याची कल्पना
दुष्काळातच येते. तहान लागली असताना
पाणी मिळाले नाही की, डोळ्यात पाणी उभे
राहते ! खेडोपाडी पाण्यासाठी लोकांना डोक्यावर
हंडे, कळश्या घेऊन अनेक मैल हिंडावे लागते.
पाण्याविना शेती फुलत नाही.
   आता जगात सगळीकडे पाण्याचा प्रश्न उभा
आहे. कारण पृथ्वीवरील माणसांना आवश्यक
आहे,  एवढा पाण्याचा साठा उरला नाही.
पृथ्वीच्या पोटातील पाण्याची पातळी खालावत
आहे. आकाशातून पडणारे पावसाचे पाणी
जमिनीत मुरवण्याचा प्रयत्न हा पाणीसंचयाचाच
भाग आहे. पाणी आपण वाचवले पाहिजे. ते
जमिनीत मुरवले पाहिजे. तरच यापुढे माणसाचा
टिकाव लागणार आहे.

 संकलन :- शंकर सिताराम चौरे (प्रा. शिक्षक)
               जि. प. प्रा. शाळा बांडीकुहेर
               ता. साक्री, जि. धुळे
                📞  ९४२२७३६७७५

No comments:

Post a Comment