माझ्या ब्लॉगवर मी श्री.शंकर चौरे आपले स्वागत करत आहे,ब्लॉग अपडेट करण्याचे काम चालू आहे..

Thursday 1 February 2018

उतारा वाचा / ऐका प्रश्नांचे  उत्तर सांगा.(आकलन)

  वृक्ष सर्वांसाठी अतिशय उपयुक्त असतात.
फळे, पाने, फुले, खोड हे वृक्षांचे सारेच
अवयव कामास येतात. अन्न, इमारतींसाठी
लाकूड, औषधे इत्यादी आपणास झाडे
प्रत्यक्षपणे देतात. तर अप्रत्यक्षपणे अनेक
प्रकारचे लाभही आपणास झाडांमुळे होतात 
आपल्याला जगण्यासाठी अत्यावश्यक असणारा
प्राणवायू म्हणजे आॅक्सिजन ! तो वृक्षांमुळे
सहजतेने मिळतो. वृक्षांची मुळे जमिनीची धूप
थांबवितात. झाडे थंड हवा देतात. पाऊस
देतात.
        झाडे जितकी जास्त तितका पाऊस
चांगला पडतो. सध्या माणसे लाभापायी अन्
लोभापायी खूप झाडे तोडत आहेत. म्हणून
पावसाचे प्रमाणही कमी होत आहे. यातून मग
दुष्काळ तीव्र पाणीटंचाई या सारख्या गंभीर
समस्या निर्माण होत आहे आहेत. त्यामुळे
वृक्षतोड थांबवून जास्तीत जास्त वृक्ष लावले.
पाहिजेत.  लक्षात ठेवा.
    ' झाडे वाढवा, भविष्य घडवा. '
-----------------------------------------------------
प्रश्न :--
(१) वृक्ष कोणासाठी उपयुक्त असतात ?
उत्तर :- वृक्ष सर्वांसाठी अतिशय उपयुक्त असतात.

(२) वृक्षांचे कोणते अवयव कामास येतात.
उत्तर :- फळे, पाने, फुले, खोड.

(३) प्राणवायू म्हणजे काय  ?
उत्तर :- आॅक्सिजन

(४) या उता-यात कोणता संदेश दिला आहे.
    ते सांगा.
उत्तर :- ' झाडे वाढवा, भविष्य घडवा. '
============================
संकलन :- शंकर सिताराम चौरे(प्रा. शिक्षक)
              जि. प.प्रा. शाळा- बांडीकुहेर 
              ता. साक्री जि.धुळे 
              ९४२२७३६७७५

No comments:

Post a Comment