माझ्या ब्लॉगवर मी श्री.शंकर चौरे आपले स्वागत करत आहे,ब्लॉग अपडेट करण्याचे काम चालू आहे..

Thursday 29 November 2018

सापाबद्दल (सर्प ) महत्वपूर्ण माहिती


(१) साप कधीच डोळे मिटत नाही.

(२) सापाचा जबडा लवचिक असल्यामुळे तो
     त्याच्या शरीराच्या आकारापेक्षा मोठे भक्ष्य
     गिळू शकतो.

(३) बिनविषारी सापांचे दात भरीव असतात.

(४) नाग, फुरसे, मण्यार व घोणसे इत्यादी
      सर्प विषारी असतात. 

(५) धामण, अजगर व गोड्या पाण्यातील साप
     बिनविषारी असतात.

(६) सापाची जीभ स्पर्शंद्रिये व श्रवणेंद्रिय असे
     दोन्ही कार्य करते.

(७) साप कात टाकते, कारण सापाला घाम
     येणारी रंध्रे नसतात. त्याच्या शरीरातील
    घाण घामावाटे बाहेर पडू शकत नाही.
    शरीरातील घाण साप कातीमार्फत बाहेर
    टाकतात.

(८) साप चावल्यावर दोन खुणा दिसतात.

(९) घरटे करणारा जगातील एकुलता एक
      साप  ' किंग कोंब्रा ' हा होय.

  =========================     
संकलक :- शंकर सिताराम चौरे(प्रा. शिक्षक)
                पिंपळनेर ता. साक्री, जि. धुळे
             📞९४२२७३६७७५

Wednesday 28 November 2018

माहिती आहे का तुम्हांला  ?

(१) रबर हा एक नैसर्गिक पदार्थ विशिष्ट झाडांचा
      चीक (रस ) गोळा करून मिळवतात. रबराचे
     झाड ब्राझील या देशात मोठ्या प्रमाणावर
     आढळते. नंतर या झाडाची लागवड इतर
      देशांत करण्यात आली. भारतात रबराचे
      उत्पादन  ' केरळ ' राज्यात होतो.
--------------------------------------------------

(२) भारतात वर्तमानपत्रांसाठी कागद तयार
      करणारा पहिला कारखाना १९५५ मध्ये
      नेपानगर  (मध्यप्रदेश ) येथे स्थापन झाला.
      सोनगढ  (गुजरात ) येथेही कागद तयार
      होतो.  महाराष्ट्रात बल्लारपूर येथे कागद
      कारखाना आहे.
--------------------------------------------------

(३)  ATM  कार्ड, क्रेडिट कार्ड इत्यादींमध्ये
       एक चुंबकीय पदार्थाची पट्टिका असते.
       त्यामध्ये तुमची आवश्यक माहिती साठलेली
       असते.
      कॉम्प्युटरची हार्ड डिस्क, आॅडिओ, व्हिडिओ,
       सीडी यांमध्ये चुंबकीय पदार्थाचा वापर माहिती
       (Data ) साठवण्यासाठी केला जातो.

==============================

 संकलन :- शंकर सिताराम चौरे (प्रा. शिक्षक )
                 पिंपळनेर ता. साक्री जि. धुळे
                 ९४२२७३६७७५ 
      

Monday 26 November 2018

' कान ' या अवयवांशी संबंधित वाक्प्रचार व त्यांचे अर्थ

================================

(१) कानात बोळे घालणे.
---  मुद्दाम न ऐकणे.

(२) कान झाकून घेणे.
---  न ऐकणे,  बोलण्याकडे दुर्लक्ष करणे.

(३) कान फुंकणे .
---  दुसर्‍याची निंदानालस्ती करणे.

(४) कानपिचक्या देणे.
---  दोष दाखवण्यासाठी समज देणे.

(५) कान भरणे.
---  एखाद्याविषयी संशय किंवा गैरसमज
     निर्माण करणे.

(६) कानीकपाळी ओरडणे.
---  वारंवार बजावून सांगणे.

(७) कानाखाली वाजवणे.
---  मारणे,  कानशिलात भडकावणे.

(८) कान उपटणे.
---  समज देणे,  अद्दल घडवणे.

(९)  कान धरणे.
---  शिक्षा करणे.

(१० ) कान फुटणे.
---  अजिबात ऐकू न येणे,  बहिरे होणे.

(११) कान किटणे.
---  एखादी गोष्ट पुन्हा पुन्हा ऐकून कंटाळणे.

(१२) कान देणे.
---  लक्षपूर्वक ऐकणे.

(१३) कानठळ्या बसणे.
---  कर्कश आवाजामुळे ऐकू न येणे.

(१४) कर्णोपकर्णी होणे.
---  सर्वांना समजणे.

(१५) हलक्या कानाचा असणे.
---  खोटी गोष्ट लगेच खरी वाटणे.

(१६) कानात बोटे घालणे.
---  नको असलेली भयंकर गोष्ट न ऐकणे.

(१७) कानी लागणे.
---  एखाद्याच्या गुप्तपणे चहाड्या करणे.

=============================     

संकलन :- शंकर सिताराम चौरे(प्रा. शिक्षक)
              ( पिंपळनेर )  धुळे
             📞९४२२७३६७७५

Sunday 25 November 2018

एका शब्दात उत्तर सांगा. (सामान्यज्ञान)

(१)साखर उद्योगास लागणारा कच्चा माल कोणता ?

---  ऊस

--------------------------------------------------

(२)कापड उद्योगास लागणारा कच्चा माल कोणता ?

---  कापूस.

--------------------------------------------------

(३) साल्हेर शिखर कोणत्या जिल्ह्यात आहे  ?

---  नाशिक

--------------------------------------------------

(४)कोकणातील नद्या कोणत्या समुद्रास मिळतात ?

---  अरबी

--------------------------------------------------
(५) महाराष्ट्रातील सर्वांत उंच शिखर कोणते  ?

---  कळसूबाई

--------------------------------------------------
(६)गोवा राज्य महाराष्ट्राच्या कोणत्या दिशेला आहे ?

---  दक्षिण

--------------------------------------------------
(७ ) भारताच्या पश्चिमेस कोणता समुद्र आहे  ?

---  अरबी

--------------------------------------------------
(८)हातमागावर काम करणाऱ्याला काय म्हणतात ?

---  विणकर

--------------------------------------------------

(९) तोरणमाळ हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे  ?
---  नंदुरबार

--------------------------------------------------

(१०)नोटा व पोस्टाची तिकिटे कोठे छापली जातात ?
       
---  नाशिक

=============================     

संकलन :- शंकर सिताराम चौरे(प्रा. शिक्षक)
              ( पिंपळनेर )  धुळे
             📞९४२२७३६७७५

Friday 23 November 2018

भारतातील महत्वाची शहरे


(१) आग्रा  :-
          आग्रा हे शहर उत्तर प्रदेशात यमुना नदीच्या
काठावर वसलेले आहे. या शहराला प्राचीन
परंपरा आहे. आग्-याचा किल्ला आणि
ताजमहाल यांसारखी उत्कृष्ट वास्तू येथे
बांधण्यात आल्या आहेत. हे शहर पर्यटन केंद्र आहे.

--------------------------------------------------

(२) अहमदाबाद :-
           अहमदाबाद हे  गुजरात राज्यातील
   महत्वाचे शहर आहे. कापडगिरण्यांसाठी प्रसिद्ध  आहे.

--------------------------------------------------

(३) कोलकाता :-
           कोलकाता हे पश्चिम बंगालची राजधानी
असलेले भारतातील सर्वात मोठे शहर आहे.

--------------------------------------------------

(४) चंदिगढ :-
           चंदिगढ हे पंजाब व हरियाणा राज्याची
राजधानी असलेले शहर आहे. 

--------------------------------------------------

(५) अंबाला :-
            अंबाला हे शहर हरियाणामध्ये आहे.
लष्करीदृष्टया महत्वाचे शहर. लष्कर छावणी
आहे. भारतीय विमानदलाचे प्रशिक्षण केंद्र आहे.

--------------------------------------------------

(६) अमृतसर :-
      अमृतसर हे सरहदीवरील पंजाब राज्यातील
 महत्त्वाचे शहर आहे. शिखांचे चौथे गुरू
 गुरू रामदास यांनी हे शहर वसविले. गुरू
अर्जुनदेव यांनी बांधलेले शिखांचे पवित्र
 सुवर्णमंदिर येथे आहे.

--------------------------------------------------

(७) वाराणसी  :-
          वाराणसी हे उत्तरप्रदेशात गंगा नदीकाठी
 वसलेले शहर आहे. बनारस व काशी नावाने
 ओळखले जाते.

------------------------------------------------

(८) मुंबई  :-
          मुंबई हे शहर महाराष्ट्र राज्याची राजधानी
  असलेले व सात बेटांनी बनलेले शहर आहे.

--------------------------------------------------

(९) हैदराबाद :-
     हैदराबाद हे आंध्रप्रदेशाची/तेलंगणाची राजधानी असलेले शहर आहे. उस्मानिया विद्यापीठ व सालारजंग म्युझियम येथे आहे.

--------------------------------------------------

(१०) पुणे :-
       ' विद्येचे माहेरघर ' म्हणून ओळखले जाणारे
 महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध शहर आहे.
औद्योगिकदृष्टया विकसित असलेले शहर आहे.
खडकी येथे संरक्षण साहित्य निर्मिती कारखाना
आहे.

--------------------------------------------------

(११) दिल्ली :-
       दिल्ली ही भारताच्या राजधानीचे शहर आहे .
नवी दिल्ली येथून संपूर्ण भारताचा प्रशासकीय
कारभार चालवला जातो. येथे राष्ट्रपती भवन,
संसद भवन, सर्वोच्च न्यायालय, तिन्ही संरक्षण
दलांची मुख्यालये येथे आहेत.

=========================     
संकलक :- शंकर सिताराम चौरे (प्रा. शिक्षक)
                 पिंपळनेर   ( धुळे )
             📞९४२२७३६७७५

Sunday 11 November 2018

सूर्यमालेतील ग्रहांची माहिती


(१) बुध :-
       बुध हा सूर्याच्या सर्वांत जवळचा ग्रह आहे.
 सूर्यापासून दूर असताना पृथ्वीवरून फक्त
 सकाळी आणि संध्याकाळी दिसतो. या
 ग्रहाभोवती उल्कापातामुळे निर्माण झालेले
 ज्वालामुखीच्या मुखासारखे खड्डे पहायला
 मिळतात. हा सर्वांत वेगवान ग्रह आहे.
--------------------------------------------------

(२) शुक्र :-
          शुक्र हा सूर्यमालेतील सर्वांत तेजस्वी
  ग्रह आहे. सामान्यतः सूर्योदयाच्या आधी
 पूर्व दिशेस व सूर्यास्तानंतर पश्चिम दिशेस
 पहावयास मिळतो. शुक्र स्वतःभोवती
 पूर्वेकडून पश्चिमेकडे फिरतो. शुक्र हा सर्वात
 तप्त ग्रह आहे.
--------------------------------------------------

(३) पृथ्वी  :-
         पृथ्वी हा सूर्यमालेतील तिसरा ग्रह आहे.
 पृथ्वीशिवाय इतर कुठल्याही ग्रहावर जीवसृष्टी
 नाही. पृथ्वी स्वतः चुंबक असल्याने पृथ्वीभोवती
 चुंबकीय क्षेत्र आहे, या चुंबकीय क्षेत्रामुळे
 सूर्यापासून येणारे हानिकारक किरण पृथ्वीच्या
 ध्रुवीय क्षेत्राकडे वळतात.
--------------------------------------------------

(४) मंगळ  :-
          मंगळ हा सूर्यमालेतील चौथा ग्रह आहे.
 मंगळावरील मातीत लोह असल्याने त्याचा
रंग लालसर दिसतो, म्हणून त्याला 'लाल ग्रह'
असे ही म्हणतात. मंगळ ग्रहावर सूर्यमालेतील
सर्वांत उंच व लांब पर्वत  'आॅलिम्पस माॅन्स '
हा आहे.
--------------------------------------------------

(५) गुरु :-
          गुरु हा सूर्यमालेतील सर्वांत मोठा ग्रह
आहे.  गुरूमध्ये सुमारे १३९७ पृथ्वीगोल सहज
मावतील इतका तो मोठा आहे. गुरू ग्रह
आकाराने प्रचंड असूनसुद्धा स्वतःभोवती फार
वेगाने फिरतो. गुरू ग्रहावर सतत प्रचंड वादळे
होत असल्याने त्यास  'वादळी ग्रह ' असेही
म्हणतात.
--------------------------------------------------

(६) शनी :-
            शनी हा सूर्यमालेतील सहावा ग्रह व
गुरू ग्रहानंतर सर्वांत मोठा ग्रह आहे. शनी एक
वैशिष्ट्यपूर्ण ग्रह आहे. कारण त्याच्या भोवती
कडी आहेत. त्याचे वस्तुमान पृथ्वीच्या ९५ पट
असतानाही त्याची घनता खूप कमी आहे.
समजा, एका मोठ्या समुद्रामध्ये जर शनी
ग्रह टाकला, तर तो चक्क तरंगू शकेल.
--------------------------------------------------

(७) युरेनस :-
            युरेनस हा सूर्यमालेतील सातवा ग्रह
आहे. या ग्रहाला दुर्बिणीशिवाय पाहता येत
नाही. युरेनस ग्रहाचा आस खूप कललेला
असल्याने तो घरंगळत चालल्यासारखा दिसतो.
--------------------------------------------------

(८) नेपच्यून  :-
                नेपच्यून हा सूर्यमालेतील आठवा
ग्रह आहे. नेपच्यूनवरील एक ऋतू सुमारे ४१
वर्षांचा असतो. या ग्रहावर अतिशय वेगवान
वारे वाहतात.
 
=========================     
संकलन :- शंकर सिताराम चौरे(प्रा. शिक्षक)
              ( पिंपळनेर )  धुळे
             📞९४२२७३६७७५

Monday 5 November 2018

भौगोलिक सामान्यज्ञान


(१) सागरी लाटा कशामुळे निर्माण होतात  ?
--- वाऱ्यामुळे .

(२) लाटांची गती कशावर अवलंबून असते  ?
---  वा-याच्या वेगावर.

(३) लाटेची लांबी कशी मोजतात  ?
---  किना-याच्या रूंदीवरून

(४) क्षारामुळे समुद्राचे पाणी कसे होते  ?
--- खारट होते.

(५) पृथ्वीच्या एकूण क्षेत्रफळाच्या किती टक्के
      भाग पाण्याने व्यापला आहे  ?
---  ७१  टक्के .

(६) पृथ्वीच्या एकूण क्षेत्रफळापैकी किती
     टक्के भाग जमिनीने व्यापला आहे  ?
---  २९ टक्के

(७) सूर्यप्रकाश पृथ्वीवर पोहोचण्यास सामान्यतः
      किती वेळ लागतो.
---  ८ मिनिटे

(८) सूर्याच्या उष्णतेने पाण्याची वाफ (बाष्प )
     होते, या क्रियेला काय म्हणतात  ?
---  बाष्पीभवन

संकलक :-  शंकर सिताराम चौरे (प्रा. शिक्षक)
                       पिंपळनेर  - साक्री, जि. धुळे
                       ९४२२७३६७७५