माझ्या ब्लॉगवर मी श्री.शंकर चौरे आपले स्वागत करत आहे,ब्लॉग अपडेट करण्याचे काम चालू आहे..

Friday 23 November 2018

भारतातील महत्वाची शहरे


(१) आग्रा  :-
          आग्रा हे शहर उत्तर प्रदेशात यमुना नदीच्या
काठावर वसलेले आहे. या शहराला प्राचीन
परंपरा आहे. आग्-याचा किल्ला आणि
ताजमहाल यांसारखी उत्कृष्ट वास्तू येथे
बांधण्यात आल्या आहेत. हे शहर पर्यटन केंद्र आहे.

--------------------------------------------------

(२) अहमदाबाद :-
           अहमदाबाद हे  गुजरात राज्यातील
   महत्वाचे शहर आहे. कापडगिरण्यांसाठी प्रसिद्ध  आहे.

--------------------------------------------------

(३) कोलकाता :-
           कोलकाता हे पश्चिम बंगालची राजधानी
असलेले भारतातील सर्वात मोठे शहर आहे.

--------------------------------------------------

(४) चंदिगढ :-
           चंदिगढ हे पंजाब व हरियाणा राज्याची
राजधानी असलेले शहर आहे. 

--------------------------------------------------

(५) अंबाला :-
            अंबाला हे शहर हरियाणामध्ये आहे.
लष्करीदृष्टया महत्वाचे शहर. लष्कर छावणी
आहे. भारतीय विमानदलाचे प्रशिक्षण केंद्र आहे.

--------------------------------------------------

(६) अमृतसर :-
      अमृतसर हे सरहदीवरील पंजाब राज्यातील
 महत्त्वाचे शहर आहे. शिखांचे चौथे गुरू
 गुरू रामदास यांनी हे शहर वसविले. गुरू
अर्जुनदेव यांनी बांधलेले शिखांचे पवित्र
 सुवर्णमंदिर येथे आहे.

--------------------------------------------------

(७) वाराणसी  :-
          वाराणसी हे उत्तरप्रदेशात गंगा नदीकाठी
 वसलेले शहर आहे. बनारस व काशी नावाने
 ओळखले जाते.

------------------------------------------------

(८) मुंबई  :-
          मुंबई हे शहर महाराष्ट्र राज्याची राजधानी
  असलेले व सात बेटांनी बनलेले शहर आहे.

--------------------------------------------------

(९) हैदराबाद :-
     हैदराबाद हे आंध्रप्रदेशाची/तेलंगणाची राजधानी असलेले शहर आहे. उस्मानिया विद्यापीठ व सालारजंग म्युझियम येथे आहे.

--------------------------------------------------

(१०) पुणे :-
       ' विद्येचे माहेरघर ' म्हणून ओळखले जाणारे
 महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध शहर आहे.
औद्योगिकदृष्टया विकसित असलेले शहर आहे.
खडकी येथे संरक्षण साहित्य निर्मिती कारखाना
आहे.

--------------------------------------------------

(११) दिल्ली :-
       दिल्ली ही भारताच्या राजधानीचे शहर आहे .
नवी दिल्ली येथून संपूर्ण भारताचा प्रशासकीय
कारभार चालवला जातो. येथे राष्ट्रपती भवन,
संसद भवन, सर्वोच्च न्यायालय, तिन्ही संरक्षण
दलांची मुख्यालये येथे आहेत.

=========================     
संकलक :- शंकर सिताराम चौरे (प्रा. शिक्षक)
                 पिंपळनेर   ( धुळे )
             📞९४२२७३६७७५

No comments:

Post a Comment