माझ्या ब्लॉगवर मी श्री.शंकर चौरे आपले स्वागत करत आहे,ब्लॉग अपडेट करण्याचे काम चालू आहे..

Sunday 25 March 2018

कारणे सांगा ?( असे का ?)


(१) सैनिकांच्या कपड्याचा रंग परिसराशी मिळता -
     जुळता असतो.

-- सैनिकांचे कपडे परिसराशी मिळते - जुळते 
  असल्यावर ते शत्रुला चटकन दिसून येत नाही. 
  शत्रूच्या नजरेतून निसटण्यासाठी हे फायद्याचे 
  ठरते. सैनिकांच्या कपड्याचा रंग परिसराशी 
  मिळता - जुळता असणे. संरक्षणाच्या दृष्टीने 
  फायद्याचे ठरते. म्हणून सैनिकांच्या कपड्याचा 
  रंग परिसराशी मिळता - जुळता असतो. 
------------------------------------------------------
(२)उन्हाळ्यात नेहमी सुती वस्त्रे वापरावीत ?

-- उन्हाळ्यात घामाचा खूप त्रास होतो. सुती 
 कपडे घाम शोषून घेऊ शकतात. घाम शोषला 
 गेला नाही तर घामोळे व इतर त्वचारोग होऊ 
 शकतात. सुती वस्त्रांमुळे शरीराभोवती हवा 
 खेळती राहून शरीराला गारवा वाटतो. म्हणून 
 उन्हाळ्यात नेहमी सुती वस्त्रे वापरावीत. 
-----------------------------------------------------
(३)रेनकोट रबरापासून किंवा प्लास्टिकपासून बनवलेला     
    असतो. का ?

-- रेनकोट रबरापासून किंवा प्लास्टिकपासून 
 बनवलेला असतो. हे रबराचे किंवा प्लॅस्टिकचे 
 कापड जलरोधक असते. रेनकोट आपण 
 पावसाळ्यात वापरतो. पावसाळ्यात पाऊस-
 पाण्यापासून रेनकोटचे हे जलरोधक कापड 
 आपले संरक्षण करू शकते. 
------------------------------------------------------
(४)लोकरीचे कपडे हिवाळ्यात वापरतात.

-- प्राण्यांच्या शरीरावरील दाट केसांपासून 
 लोकर बनवतात. हिवाळ्यात थंडी असते. 
 लोकरीचे कपडे उबदार असतात. म्हणून 
 लोकरीचे कपडे हिवाळ्यात वापरतात. 
-------------------------------------------------------
 संकलन :- शंकर सिताराम चौरे(प्रा. शिक्षक)
              धुळे (पिंपळनेर)
               ९४२२७३६७७५

No comments:

Post a Comment