माझ्या ब्लॉगवर मी श्री.शंकर चौरे आपले स्वागत करत आहे,ब्लॉग अपडेट करण्याचे काम चालू आहे..

Tuesday 25 April 2017

अनेक पदार्थ कच्चे खा

                पर्यावरण उपक्रम

               अनेक पदार्थ कच्चे खा

   संकलन :- शंकर चौरे (पिंपळनेर)धुळे
                  ¤ ९४२२७३६७७५ ¤

  अनेक पदार्थ शिजवून खाणारा माणूस
हा पृथ्वीवरचा एकमेव प्राणी आहे. उकळणे,
भाजणे,तळणे,रटा-रटा शिजवणे अशा अनेक
प्रकारांनी  तो पदार्थ शिजवतो. पदार्थ
पचनाला हलके होण्यासाठी किंवा ते रसपूर्ण
होण्यासाठी हे बऱ्याचदा आवश्यक असते.
   पण कधी-कधी यांचा अतिरेक ही होतो.
ज्या गोष्टी कच्च्या खाल्ल्यातरी पचतात. किंवा
शिजवल्यामुळे ज्यातला सत्वांश कमी होतो.
अशाही गोष्टी आपण शिजवतो. टोमॅटोच सूप,
कोबीची भाजी, कोथिंबींरच्या वड्या, ओल्या
नारळाच्या करंज्या, हे असे काही पदार्थ
शिजवल्यावर ते वाईट लागतात असे नाहीत.
पण ही फळे किंवा भाज्या न शिजवताचं
खाणं अधिक चांगलं.आरोग्यासाठीही आणि
पर्यावरणासाठी ही, कारण त्यामुळे इंधन
वाचतं.
  टोमॅटो, कोबी, काकडी, कैरी, गाजर यांच्या
कोथिबींरी -चटण्या करा. कोथिबींरी कढीपत्ता,
ओला नारळ हे पदार्थ मुळ अन्नपदार्थ
शिजवल्यानंतर वर घाला. मोड आलेली
कडधान्यं कच्चीच चावून खा. शिजवल्यामुळे
नाश पावणारे अनेक अन्नघटक अशा कच्च्या
आहारामुळे आपल्याला मिळतील.

   संकलन :- शंकर सिताराम चौरे(प्रा.शिक्षक)
                 जि.प प्रा.शाळा बांडीकुहेर
                 ता.साक्री जि.धुळे
                 📞 ९४२२७३६७७५

ऐकण्याची कला

                ऐकण्याची कला

   संकलन :- शंकर चौरे (पिंपळनेर) धुळे
                 ¤ ९४२२७३६७७५ ¤

  निसर्गाने आपणाला दोन कान व एक
तोंड दिले आहे. याचा अर्थ आपण जास्त
ऐकावे व कमी बोलावे खूपशा वेळी आपण
व्यवस्थित न ऐकल्यामुळे समजत नाही.
गैरसमज निर्माण होतात.

कृती  :-
(१)दुसर्‍याचे म्हणने ऐकताना आपण रस
    घेऊन ऐकतोय असे दाखवा.

(२)थोडे पुढे झुकून ऐकावे.

(३)ऐकताना पूर्वग्रह मनात ठेवू नये.

(४)ऐकताना तुलना करू नये.

(५) ऐकताना निसर्ग आपणाला काही
     निरोप देतोय ही भावना ठेवावी.

(६)बोलणाऱ्याला मध्येच थांबवू नये.

(७)वक्त्याचा काही भाग आपणाला समजला
   नसेल तर पुन्हा सांगण्याची विनंती करावी.

(८)पटकन अनुमान लावू नये.

(९)बोलणाऱ्याच्या डोळ्यात पाहून ऐकावे.

(१०) ऐकताना शरीर संतुलित ठेवावे.

फायदे :-
(१)ज्ञानात भर पडते.

(२)आत्मसंयमन प्राप्त होते.

(३)संबंध सुधारतात.

(४) दृष्टिकोन विशाल होतो.

   संकलन :- शंकर सिताराम चौरे(प्रा.शिक्षक)
                  पिंपळनेर  ता.साक्री जि.धुळे
                  📞 ९४२२७३६७७५

माहिती तंत्रज्ञानाची उद्दिष्टे

        माहिती तंत्रज्ञानाची उद्दिष्टे

  संकलक :- शंकर चौरे (पिंपळनेर ) धुळे
                  ¤ ९४२२७३६७७५ ¤

  कोणत्याही कार्याचे, घटकाचे उद्दिष्टे निश्चित
केलेली असतील तर त्या उद्दिष्टे प्राप्तीसाठी
काय -काय उपाययोजना करावी लागेल
याचा विचार होतो. म्हणून माहिती तंत्रज्ञानाची
उद्दिष्टे आहेत ते जाणून घेणे गरजेचे आहे.
माहिती तंत्रज्ञानाची उद्दिष्टे पुढील प्रमाणे
आहेत.

(१)प्रत्येक क्षेत्रातील माहिती अद्ययावत ज्ञानाची
   शिक्षकांना माहिती तंत्रज्ञानाच्या माध्यमातून
   जाणिव करुन देणे.

(२)प्रत्येक क्षेत्रातील माहिती कमीत कमी वेळात
   व अचूक मिळवणे.

(३)जगात उपलब्ध असलेल्या कोणत्याही
    क्षेत्रातील माहितीचा शोध घेणे.

(४)माहिती तंत्रज्ञानाचा शालेय शिक्षणात उपयोग
    करणे.

(५)शिक्षकांनी माहिती तंत्रज्ञानाच्या माध्यमातून
   अचूक व अद्ययावत अध्यापन करणे.

(६) विद्यार्थ्यांनी माहिती तंत्रज्ञानाच्या सहाय्याने
    अचूक व अद्ययावत स्वयं अध्ययन करणे.

(७)उपलब्ध ज्ञान मिळविण्यासाठी निरनिराळ्या
    तांत्रिक साधनांचा अभ्यास करणे.

(८)माहिती तंत्रज्ञानाचे एक प्रभावी साधन म्हणून
    संगणकाचा अभ्यास करणे.

(९)संगणकातील यांत्रिक साहित्य व प्रेरक
    साहित्य यांचा अभ्यास करणे.

(१०)प्रेरक साहित्याची प्रणाली व उपयोग
    अभ्यासणे.

(११)सांख्यिकी माहितीसाठी संगणकाचा
      उपयोग करणे.

(१२)बहुमाध्यम संगणकाचा अध्ययन -
       अध्यापनासाठी उपयोग करणे.

(१३)संगणक -इंटरनेट परिचय करून देणे,
      व वापर करणे.

(१४)शिक्षणात व्हिडिओ कॉन्फरन्स व
     टेलिकाॅन्फरन्सचा उपयोग करणे.

(१५)इंटरनेटद्वारे परस्पर संपर्क वाढविणे
      व संदेश देणे आणि स्वीकारणे.

   संकलक :- शंकर सिताराम चौरे(प्रा.शिक्षक)
                  जि.प प्रा.शाळा बांडीकुहेर
                   ता.साक्री जि.धुळे
                   📞 ९४२२७३६७७५

Wednesday 19 April 2017

पर्यावरण संरक्षण व संवर्धन

         पर्यावरण संरक्षण व संवर्धन

  माणसाने निसर्गाच्या रचनेमध्ये हस्तक्षेप
केल्याने जंगल ओसाड पडणे,पाणी, हवा
दूषित होणे, जमीन नापीक बनने, पाऊस
वेळेवर व पुरेसा न पडणे असे दुष्परिणाम
जाणवत आहेत. पर्यावरणाचे संतुलन
बिघडल्याने या समस्या जाणवत आहेत.
या समस्यांच्या निराकरणासाठी पर्यावरणाचे
स्वरूप समजून घेणे आणि सभोवतालच्या
निसर्गाचे योग्यप्रकारे संरक्षण व संवर्धन करणे
अत्यंत आवश्यक आहे. यासाठी जंगलतोड
पूर्णपणे थांबविणे, वन्य पशुंसाठी
अभयारण्याची व्यवस्था करणे,खनिज
संपत्तीचा काटकसरीने वापर करणे, सर्व
प्रकारच्या प्रदूषणांवर नियंत्रण राखणे.
यासारखे उपाय योजने क्रमप्राप्त आहे.
  त्याचप्रमाणे वृक्ष लागवड करणे, कुरणांचे
क्षेत्र वाढविणे या मार्गांनी पर्यावरणांचे संवर्धन
करावे. पर्यावरण संरक्षण व संवर्धन मानव
जाणीवपूर्वक करू शकतो. कारण मानव
हा पर्यावरणातील सर्वात बुध्दीमान प्राणी
आहे. यासाठी पुढील चार सुत्रे महत्वाची
आहेत.

(१)वापर पूर्णपणे टाळणे --
--प्लॅस्टिक पिशव्यांचा व तत्सम पदार्थांचा.

(२)वापर कमीत कमी करणे --
-- विज, पाणी, इंधनावर चालणारी वाहणे.

(३)पूर्णपणे वापर करणे -
-- कागदाच्या दोन्ही बाजूस लिहिणे, कपडे,
   चमड्याच्या वस्तू इ. पूर्णपणे वापरणे.

(४) पुनर्वापर करणे --
-- सांडपाणी झाडांना द्यावे, घरातील
  केरकचरा यापासून कंपोस्ट, सेंद्रिय खत
  तयार करणे.
       वरील सर्व उपाययोजना व त्यांची
अंमलबजावणी याद्वारे पर्यावरणाचे संवर्धन
तसेच संरक्षण होण्यास मदत होते.

      ✍शंकर सिताराम चौरे(प्रा.शिक्षक)
                जि.प.प्रा. शाळा बांडीकुहेर
                ता.साक्री जि.धुळे
                📞 ९४२२७३६७७५

Tuesday 18 April 2017

पर्यावरण रक्षणासाठी उद्याचे ' दिपक 'व्हावे !

 🔹पर्यावरण रक्षणासाठी उद्याचे ' दिपक 'व्हावे !🔹

    लेखन :-- शंकर चौरे  (पिंपळनेर)धुळे
                     ☆ ९४२२७३६७७५ ☆
   मित्राने, या पृथ्वीवर आपण आज मोठय़ा
आनंदाने राहत आहोत. चैतन्य, सौंदर्य,समृद्धी,
सुंदरता.... इतकेच नव्हे, तर स्वर्गसुखच या
भूतलावर अवतरले. माणसाचे जीवन पिढ्या-
पिढ्या उमलू लागले; वस्त्या फुलू लागल्या.
विकासाचे चक्र गतीने फिरू लागले.पुढे पुढे
ही गती अधिकच वाढली; अनियंत्रित झाली.
त्यातून पर्यावरणाच्या समस्यांचा डोंगर उभा
राहिला.
   या पर्यावरण समस्यांकडे डोळेझाक केल्यास
त्या अधिकच तीव्र बनण्याची शक्यता नाकारता
येत नाही. पर्यावरण समस्या आणि त्यातून
उद्भवणाऱ्या भीतीदायक भविष्याताची धोक्याची
सूचना आहे का ?माणसाच्या स्वार्थात पर्यावरणा
-ची आहुती तर पडणार नाही ना ? परिस्थिती
नुसतीच कठीण आहे की भयावह आहे.
साडेचार अब्ज वर्षांचा इतिहास असलेल्या या
वसुंधरेच्या माणसाच्या फक्त १०० -१५०
वर्षातील उद्योगांनमुळे नाश तर होणार नाही ना ?
पर्यावरणाची सर्वत्र हानी होत असलेल्या या
समस्येवर खरच काहीच उपाय नाही का  ?
     सगळीकडे आशेचे दीप मंदावत असताना,
जगाच्या काही कोपर्‍यात मात्र काही मिणमिणते
दिवे हा अंध:कार निकराच्या प्रयत्नाने दूर करत
आहेत .
    पर्यावरण रक्षणाचे व्रत घेतलेले आणि त्याचा
ध्यास असलेले मोजकेच लोक आपापल्या परीने
या कार्यात खारीचा वाटा उचलत आहेत. जगाने
वेडे ठरवलेले असे काही जण आपल्या आजू-
बाजूसही असतात. काही जण आपल्या दैनंदिन
जीवनात फक्त पाठकोरे कागदच वापरतात ;
तर काही जण प्लास्टिकचा वापर कटाक्षाने
टाळतात. गाडी घ्यायची ऐपत असूनही काही
जण आयुष्यभर सायकलच वापरतात; तर
काहीजण देवासाठी नव्हे, तर निसर्गासाठी
एक दिवस खराखुरा उपवास करतात.आपल्याला
वेड्यासारखे भासणारे हे लोक त्यांचा मार्ग
अत्यंत शहाणपणाने स्वीकारता.
   वैयक्तिक स्तरावरील हे प्रयत्न कधीतरी सांघिक
स्वरूपही घेतात. मेधा पाटकरांचे 'नर्मदा बचाव
आंदोलन ' एकत्रित ग्रामीण विकासाच्या कल्पने-
वर आधारित अण्णा हजारे यांची आदर्श गाव
योजना, धुळे जिल्ह्य़ातील साक्री तालुक्यात
बारीपाडा या गावात चैत्राम पवार या आदिवासी
युवकाने  ' जंगल रक्षणासाठी चालवलेली मोहीम
आदी सारे आपापल्या परीने झटत आहेत.
या सर्व आंदोलनांना मिळालेल्या यशापशापेक्षा,
पर्यावरणाचा विषय ऐरणीवर येऊन लोकजागृती
केल्याचे त्यांचे योगदान अंत्यत महत्वाचे आहे.
     पर्यावरणाचा आवाका पाहता हे प्रयत्न भले
तुटपुंजे वाटतील;पण या छोट्या छोट्या प्रयत्नांनी
पर्यावरण रक्षणाचे मोठे कार्य केले आहे. 'पर्यावरण
समस्या ' या अंध:काराच्या विशाल पटलावर
आशेचे मंद दिवे मोठ्या धैर्याने, नेटाने प्रकाश
देत आहेत, मार्ग दाखवत आहेत.
   जेव्हा अशा प्रयत्नांचे हजारो, लाखो,करोडो
दीप उजळतील, तेव्हा पर्यावरण समस्या ही
'समस्या ' राहणारच नाही.  अर्थात त्याची सुरुवात
आपल्यापासून डोळसपणे व्हायला नको का  ?
   मी शेवटी एवढेच म्हणेन पर्यावरणाचा अभ्यास
करून सर्व बांधवांनी उद्याच्या "अंध:कारातील
मिणमिणते दीपक " व्हावे हीच मनीषा  !
     प्रदूषण मुक्त दिवाळी साजरी करूया.
  ||  जय पर्यावरण --जय वसुंधरा  ||

            लेखन :- शंकर चौरे
                       पिंपळनेर ता.साक्री जि.धुळे
                        📞 ९४२२७३६७७५

मानवी संरक्षक  : झाडे

            मानवी संरक्षक  : झाडे

  आज प्रदूषणाचा त्रास सर्व जगाला होत
आहे. आज हवेत प्रदूषण आहे. पाण्यात
आहे,औषधातही प्रदूषण आहे. जगभर
त्यावर चर्चा होते. परिसंवाद होतात. पण
ही समस्या कमी होण्याऐवजी वाढतेच आहे.
   हवेतील प्रदूषण मानवनिर्मित आहे.
त्यापैकी कर्बद्विवायू हाही मानवनिर्मित
कारखाने, इंधनाचे ज्वलन, वाहने यामुळे
होतो. यामुळे हवेचे संतुलन बिघडते,
निरनिराळे रोग होतात.
प्रदूषणावर नियंत्रण करण्यास वृक्षलागवड
हा एक उपाय आहे. वने,उपवने निर्माण
करणे आवश्यक आहे.

  ● *झाडामुळे हवा शुध्द होते* :-
--- वातावरण शुध्द हवे असे प्रत्येकालाच
वाटते. त्यात प्राणवायू जास्त असणे जरुरी
आहे. हा प्राणवायू झाडे सोडतात. त्यामुळे
झाडे जास्त तर प्राणवायू जास्त. प्राणवायू
जास्त तर रोगराई कमी  हे गणित दिसते.

● *झाडांना महत्त्व*  :-
झाडांना महत्त्व देण्याचे कारणही तसेच आहे.  हवेतील वाढणाऱ्या अफाट कर्बद्विवायू शोषण
झाडे करतात. हवेत प्राणवायू सोडतात.

● *झाडे काय करतात ?* :-
-- झाडे अनेक प्रकारे प्रदूषण नियंत्रण
करतात.
(१)प्रदूषित हवेत शुध्द हवा मिसळतात.
त्यामुळे हवेचा विषारीपणा कमी होतो.

(२)अनेक विषारी कण पानातून, खोडातून
व मुळ्यातून झाडाव्दारे पकडून ठेवले
जातात.

(३)झाडाव्दारे अनेक सुगंध व कीटकनाशक
  द्रव्ये हवेत सोडली जातात.

(४)वातावरणातील तापमानाची तीव्रता
    झाडामुळे कमी होते. थंड हवा उत्साह
"   वाढवते.
   थोडक्यात काय तर झाडं ही प्रदूषण
नियंत्रक आहेत. ते मानवाचे संरक्षक
आहेत. त्यांना आपण जपल्यास ते
आपले अनेक रोगांपासून संरक्षण करतील.

   ✍शंकर सिताराम चौरे(प्रा.शिक्षक)
        जि.प प्रा.शाळा बांडीकुहेर
        ता.साक्री जि.धुळे
        📞 ९४२२७३६७७५

पाणी वाचवण्याचे सोपे उपाय

    पाणी वाचवण्याचे सोपे उपाय

(१)नळ वाहते ठेवू नका. उपयोग करून
    झाल्यावर नळ बंद करा.

(२)नळात काही दोष असेल तर तपासून
  घ्या आणि गळणा-या नळांची ताबडतोब                                     दुरूस्ती करून घ्या.

(३)पिण्याचे स्वच्छ पाणी भांडी घासण्यासाठी
    किंवा कपडे धुण्यासाठी वापरू नका.

(४)रात्रभर साठलेले पाणी दुसर्‍या दिवशी
    वापरण्यासाठी सुरक्षित असते. ते फेकून
    देऊ नका. जास्त वेळ साठवलेले पाणी
   भांडी घासण्यासाठी, स्वच्छतेसाठी,
   बागकामासाठी वापरता येईल.

(५)दात घासताना नळ वाहता ठेवू नका.
    भांड्याचा उपयोग करा.

(६)अंघोळ करताना बादलीत पाणी घ्या.
     शाॅवरमधून पाणी घेऊ नका किंवा
    बाथटबचा वापर करू नका.

(७)फळे -भाजीपाला धुण्यासाठी वापरलेला
    पाण्याचा उपयोग झाडांना घालण्यासाठी
    करा.

(८)हिरवळीला पहाटे लवकर पाणी घाला.
  ज्यामुळे बाष्पीभवनामुळे उडून जाणाऱ्या
  पाण्याचे प्रमाण कमी होईल.
   
(९)तुमच्या घरासमोरील रस्ता, गॅरेज किंवा
   फुटपाथ पाण्याने धुवून काढण्याऐवजी
  झाडून घ्या.

(१०)शेताला एकदम पाणी देण्यापेक्षा
    ठिबक सिंचन पध्दतीचा उपयोग करा.

संकलक :- *शंकर सिताराम चौरे*(प्रा.शिक्षक)
              जि.प प्रा.शाळा बांडीकुहेर
              ता.साक्री जि. धुळे
             📞 ९४२२७३६७७५

विद्यार्थ्यांनो : खेळा...स्वतःला शोधा !

विद्यार्थ्यांनो : खेळा...स्वतःला शोधा !

  सुट्टीचा अतिशय उत्सुकतेने वाट पाहणाऱ्या
माझ्या बालमित्रानो आपली बुद्धीमत्ता
ओळखण्यासाठी आणि वाढविण्यासाठी
काही खेळ दिले आहेत. ते खेळा .काही
कृती करून बघा. इतरांची निरीक्षणं करा.
योग्यप्रकारे टी. व्ही.चा वापर करून बघा.

(१)कोणतेही मैदानी खेळ खेळा.

(२)गायन, वादन,नर्तन यांपैकी जे
     आवडेल ते शिका.

(३)जोरात पळणे,संथ चालणे,सायकल
    अशा वेगवेगळ्या शर्यती लावा.

(४)व्यायाम करा.

(५)नाच करा.

(६)कलाकुसरीची कामे,हस्तकलेच्या
    वस्तू तयार करा.

(७)आपल्या गावात/सोसायटीत इतरांच्या
    मदतीने एखादा कार्यक्रम स्वतः आखा.
    उदा. स्वच्छता मोहीम /झाडं लावणं -
    झाडं जगवणं.

(८)आजी -आजोबांचे अनुभव ऐका.
   त्यांच्या लहानपणीविषयी,शाळेविषयी
   माहिती काढा.

(९)घरात बसून टी. व्ही. बघण्यापेक्षा
    बाहेर पडा.

(१०)पुस्तकांमध्ये खूप विविधता असते.
    सगळे प्रकार बघा. चरित्र, जादूच्या
    गोष्टी, विज्ञानविषयक, कविता  इ.

(११)वाचलेल्या पुस्तकांविषयी कोणाशीतरी
      बोला.

(१२)छोट्या मुलांना जमवून गोष्टी सांगा.

(१३)शब्दकोडी,चित्रकोडी सोडवा.
      विविध भाषिक खेळ खेळा.

(१४)शक्य असल्यास नवीन भाषा शिका.

(१५)अंकांशी खेळा. फावल्या वेळात
       गणिती कोडी सोडवा.

(१६)घरातल्या खर्चाचं अंदाजपत्रक तयार
      करा. जमाखर्च लिहा.

(१७)लहानांना गणित शिकवा.

(१८)जेवढी झाडं,फळं,फुलं ओळखू
     शकता त्या सर्वांविषयीची माहिती
     देणारी वही तयार करा.

(१९)निसर्गातल्या सर्वच घटकांविषयी
      सादर होणारे कार्यक्रम डिस्कव्हरी
      चॅनलवर बघा.

(२०)बी लावा. तिचं रोप कधी येतं ते बघा.
 त्याची वाढ कशी होते,याचं निरीक्षण करा.
            
(२१)चित्र काढायला आवडत असेल तर
      बघून चित्र काढण्यापेक्षा मनाने
      चित्र काढा.

(२२)वाद्य वाजवायला आवडत असेल
       तर ते शिका.

(२३) आपल्या अभ्यासाचं मूल्यमापन
       स्वतःच करा.

 संकलक :- शंकर सिताराम चौरे(प्रा.शिक्षक)
              जि.प.प्रा. शाळा बांडीकुहेर
              ता.साक्री जि.धुळे
              📞९४२२७३६७७५

मनोरंजन व ज्ञानार्जन

            मनोरंजन व ज्ञानार्जन

(१)जे खातात -पितात पण चालत नाही,
     ते काय आहे  ?

(२)कितीही उंचावरून पडले तरी ते
     मोडत नाही.

(३)असे पाच आकडे मांडा की ज्याची
     बेरीज १५ येईल. आकडे वेगवेगळे
     पाहिजे  ?

(४)ज्याला मान आहे पण डोकं नाही,
    हात आहेत पण पाय नाही -तो
    कोण आहे  ?

(५)अशा दोन महिन्यांची नावे सांगा की
   जे पाठोपाठ येतात व  ३१ दिवसाचे
   असतात, परंतु जुलै ,आॅगस्ट मात्र नाही.

   Ⓜ🅰🅿Ⓜ🅰🅿Ⓜ🅰🅿

उत्तरे :-(१) झाडे, (२)झाडाचे पान.

(३) १ +२ + ३+ ४ + ५ = १५

(४) शर्ट,  (५) जानेवारी व डिसेंबर.

------------------------------------------------

संकलक :- शंकर सिताराम चौरे(प्रा. शिक्षक)
             जि.प.प्रा. शाळा बांडीकुहेर
              ता.साक्री जि.धुळे
               📞 ९४२२७३६७७५

डाॅ. बाबासाहेब आंबेडकर


    डाॅ. बाबासाहेब आंबेडकर
      (भीमराव रामजी आंबेडकर )

        डाॅ. बाबासाहेब आंबेडकर हे थोर
समाजसुधारक होते. त्यांचा जन्म
१४ एप्रिल १८९१ रोजी मध्यप्रदेशातील
महू या गावी एका गरीब कुटुंबात झाला.
रत्नागिरी जिल्ह्यातील आंबवडे हे त्यांचे
मूळ गाव. त्यांचे सुरूवातीचे प्राथमिक
शिक्षण दापोलीच्या शाळेत झाले.
  माध्यमिक शिक्षणासाठी ते मुंबईत आले.
उत्तम  तऱ्हेने मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाले.
बडोदा सरकारची शिष्यवृत्ती मिळवून
एल्फिन्स्टन कॉलेजात गेले. तिथून पदवी
संपादन केल्यावर बडोदे सरकारच्या मदतीने
भीमराव अमेरिकेस गेले. अर्थशास्त्रात
एम. ए.; पी. एच. डी. पदवी प्राप्त करून
ते परत भारतात आले. मुंबईत सिड्नहॅम
कॉलेजात प्राध्यापकाची नोकरी करू लागले.
नोकरी करीत असतानाच आपल्या अस्पृश्य
समजण्यात येणाऱ्या बांधवांना त्या त्रासातून
मुक्त करण्यासाठी त्यांच्यात जागृती निर्माण
केली.
       पुढे कोल्हापूरच्या छत्रपती शाहू 
महाराजची मदत घेऊन ते इंग्लंडला गेले
आणि अर्थशास्त्रातील डी. एस. सी. ही
सर्वोच्च पदवी व बॅरिस्टर ही पदवी संपादन
करून ते मुंबईच्या सरकारी महाविद्यालयात
आधी प्राध्यापकाची व मग प्राचार्य म्हणून
नोकरी करू लागले. महाडचे चवदार तळे
व नाशिकचे काळाराम मंदिर अस्पृश्यांना
खुले करण्यासाठी त्यांनी सत्याग्रह केले.
  बाबासाहेबांना दलित समाजाविषयी खूप
कळकळ होती. दलितांची सुधारणा व्हावी.
म्हणून ते झटले. जातीभेद नाहीसा व्हावा,
असे त्यांना वाटे. यासाठी लोकांनी खूप
शिकले पाहिजे, असे त्यांना वाटे. यासाठी
त्यांनी शाळा व महाविद्यालये काढली.
शिक्षणाचा प्रसार केला.
  त्यांना वाचनाचे खूप वेड होते. त्यांनी
स्वतः खूप ग्रंथ लिहिले होते. डाॅ. बाबासाहेब
आंबेडकर कायदेपंडित म्हणून ओळखले
जात.ते स्वतंत्र भारताच्या घटनेचे शिल्पकार
होते.
  ६ डिसेंबर १९५६ मध्ये त्यांचे निर्वाण झाले.
  अशा या भारताच्या थोर सुपुत्राला सरकारने
' भारतरत्न ' ही पदवी बहाल केली.

 संकलक :- शंकर चौरे  (प्रा.शिक्षक)
            पिंपळनेर  ता.साक्री जि.धुळे
         📞 ९४२२७३६७७५

आपल्या पाल्याचे मित्र बना !

       आपल्या पाल्याचे मित्र बना !
             
  कुमारावस्था १३ ते १८ वर्षे
  हिच वेळ आहे पाल्याला समजून घेण्याची
  स्वतःमधील सहनशीलतेची कसोटी
  पाहण्याची
  आपलंही तरूणपण आठवून,त्याच्या सोबत
मित्र बनून राहण्याची !

  पालकहो,
        आपल्या पाल्याचे १३ ते १८ वर्ष वय
म्हणजे त्याला Teenage म्हटलं जाते. या
वयात त्याचे वजन साधारणत: ३५ व ४८
किलो पर्यंत असते. या वयात त्याच्या मेंदूचा
विकास २% होतो. हा काळ म्हणजेच
स्वत:चा विकास होण्याचा अर्थात पूर्ण
शरीर धारण करण्याचा काळ, वैचारिक
परिपक्वता न आल्याने मित्र मैत्रिणी कोणत्या
निवडाव्यात, वर्तनाच्या मर्यादा कोणत्या
असाव्यात हे न समजण्याचा काळ, मन
गोंधळलेल्या अवस्थेत असल्याने बेचैन व
स्वत: निर्णय काय घ्यावा हे न समजण्याचा
काळ, 'मी आता मोठा झालो आहे.' अशा
स्वतंत्र अस्तित्वाची जाणीव होण्याचा काळ.
      आज आपण विज्ञान युगात वावरत
आहोत, काळ झपाटय़ाने बदलत आहे.
दूरदर्शनवर चांगल्या गोष्टी दिसतात.त्याचप्रमाणे
ऐकू नये, पाहू नये अशाही गोष्टी कानांवर,
डोळ्यासमोर येत आहे.त्याप्रमाणे मोबाईलचा
अतिवापर या सर्वांमुळे आपण व आपली
मुले यांच्यातील संवाद कमी झाला आहे.
दोन्ही पालक नोकरी निमित्ताने बाहेर असल्याने
नको तितक्या गरजा पुरविल्या जात आहेत.
  येथे एक गोष्ट स्पष्ट कराविशी वाटते की,
आपलं हे मुल मोठं होताना पाहिलेले असूनही
त्याचं मोठं होणं स्वीकारायला आपलं मन
तयार नाही.
        याच काळात मुले कौतुकासाठीही
आसुसलेली असतात. त्यांच्याशी सुसंवाद
साधून, त्यांना वेळ देवून त्यांना आपल्या
चर्चेत सहभागी करायला हवे. त्यांच्या मित्र
मैत्रिणींशी आदराने बोलून,सुट्टीच्या कालावधीत
नातेवाईकांमध्ये मिसळण्याची संधी द्यायला
हवी.
 दूरदर्शनच्या बातम्यांमधून कळणारी महागाई,
दहशतवाद,शेतकऱ्यांच्या आत्महत्या,अगदी अलिकडेच बारामती मधील१७ वर्षाच्या ११वीच्या
मुलीने केलेली आत्महत्या,संसदेत चाललेला
गोंधळ, पाण्याचा प्रश्न याविषयी आपल्या
मुलांशी  वैचारिक बैठक घेतल्यास मुले    
आवर्जुन वर्तमान पत्र,मासिके वाचतील, टीव्ही
वरील बातम्या रोज पाहून आपली मते व्यक्त
करतील,वेगळ्या विचारात  स्वतःला गुंतवून
ठेवतील.
  आई -बाबांची आपल्या पाल्याशी वागणूक
सारखेपणाची असावी.

  संकलक :- शंकर सिताराम चौरे(प्रा.शिक्षक)
                  पिंपळनेर ता.साक्री जि.धुळे
                  📞 ९४२२७३६७७५