माझ्या ब्लॉगवर मी श्री.शंकर चौरे आपले स्वागत करत आहे,ब्लॉग अपडेट करण्याचे काम चालू आहे..

Sunday 22 July 2018

लोकमान्य टिळक


   लोकमान्य टिळक यांचे संपूर्ण नाव बाळ
गंगाधर टिळक असे होते. त्यांचा जन्म
२३ जुलै १८५६ रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील
चिखली या गावी झाला. त्यांचे मूळ नाव
केशव असे होते. पण  'बाळ ' हे टोपण नावच
कायम राहिले. त्यांचे शिक्षण पुण्यात झाले.
   लोकमान्य टिळक हे इंग्रज सरकारच्या
अन्यायी व पक्षपाती धोरणा विरूद्ध आवाज
उठविण्यात नेहमीच आघाडीवर होते. त्यासाठी
त्यांनी अनेकदा कारावासही भोगला होता.
    ' स्वराज हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे '
हे त्याचे घोषवाक्य होते. .लोकांनी त्यांना
'लोकमान्य ' ही पदवी दिली. कारण त्यांनी
आपले सारे आयुष्य देशाच्या व देशबांधवांच्या
सेवेत घालविले. त्यांनी स्वातंत्र्यासाठी सत्याग्रह
व चळवळी उभारली. त्यांनी 'केसरी ' व 'मराठा'
ही वर्तमानपत्रे सुरू केली. शिक्षणासाठी पुण्यात
' न्यू इंग्लिश स्कूल ' ही शाळा काढली.
लोकजागृतीसाठी  'सार्वजनिक' गणेशोत्सव'
व  'शिवजयंती' हे उत्सव सुरू केले.
   अनेक वेळा तुरुंगवास भोगूनही ते आपल्या
ध्येयापासून ढळले नाहीत.
   १ आॅगस्ट १९२० रोजी त्यांचे निधन झाले.
भारतातील एका तेजस्वी सूर्याचा अस्त झाला

संकलन :- शंकर सिताराम चौरे(प्रा. शिक्षक)
             📞९४२२७३६७७५ (धुळे ) 

No comments:

Post a Comment