माझ्या ब्लॉगवर मी श्री.शंकर चौरे आपले स्वागत करत आहे,ब्लॉग अपडेट करण्याचे काम चालू आहे..

ब्लॉग भेटी.

Tuesday, 18 April 2017

बर्फाचा वापर टाळा.

                पर्यावरण उपक्रम

            बर्फाचा वापर टाळा.

     उन्हाळ्याच्या दिवसात आपण उपहारगृहात
गेलो, रसपानगृहात गेलो किंवा फळांचा
रस पिण्यास गेलो, तर गोठलेल्या पाण्याशी
आपला संबंध येण्याची दाट शक्यता असते.
ऊसाच्या रसाच्या पेल्यात किंवा फळांच्या
रसात ह्या प्रकाराने पाणी मिसळले जाते.
     हे गोठलेले पाणी, म्हणजेच बर्फ, हा
केवळ तात्कालिक गारवा निर्माण करणारा
पदार्थ आहे. बर्फाचे थंडगार पाणी पितांना
बरे वाटते, पण त्याने तहान भागत नाही
असा अनुभव येतो.शिवाय अतिशीत पदार्थांचं
अशा प्रकारे सेवन करणं शरीरालाही
अपायकारक असतं. बर्फ करण्यासाठी
वापरलेले पाणी अनेकदा अशुद्ध असते.
अनेकांना साथीच्या रोगांची लागण ऊसाच्या
रसातल्या बर्फाने होते. ह्या सगळ्याला एक
पर्यावरणाची बाजूही आहे -ती महत्वाची.
बर्फ तयार करण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणावर
ऊर्जा खर्च होते. पाण्यातली उष्णता काढून
घेऊन ते गोठवण्यासाठी ही ऊर्जा लागते.
एका अनावश्यक,अपायकारक पदार्थासाठी
दुर्मिळ ऊर्जा खर्च करणे बरोबर आहे का ?
    बर्फाचा एक -अष्टमांश भाग आपल्याला
दिसतो आणि उरलेला पाण्यात असतो तो
दिसत नाही. हेच प्रमाण बर्फाच्या फायद्या
तोट्याचं आहे. एक अष्टमांश फायदा आपण
बघतो, पण सात- अष्टमांश तोटा मात्र
आपल्याला दिसत नाही.

   संकलक :- शंकर सिताराम चौरे(प्रा.शिक्षक)
                जि.प प्रा.शाळा बांडीकुहेर
                ता.साक्री जि. धुळे
                 📞 ९४२२७३६७७५

Friday, 7 April 2017

मानवी संरक्षक  : झाडे

            मानवी संरक्षक  : झाडे

  आज प्रदूषणाचा त्रास सर्व जगाला होत
आहे. आज हवेत प्रदूषण आहे. पाण्यात
आहे,औषधातही प्रदूषण आहे. जगभर
त्यावर चर्चा होते. परिसंवाद होतात. पण
ही समस्या कमी होण्याऐवजी वाढतेच आहे.
   हवेतील प्रदूषण मानवनिर्मित आहे.
त्यापैकी कर्बद्विवायू हाही मानवनिर्मित
कारखाने, इंधनाचे ज्वलन, वाहने यामुळे
होतो. यामुळे हवेचे संतुलन बिघडते,
निरनिराळे रोग होतात.
प्रदूषणावर नियंत्रण करण्यास वृक्षलागवड
हा एक उपाय आहे. वने,उपवने निर्माण
करणे आवश्यक आहे.

  ● झाडामुळे हवा शुध्द होते  :-
--- वातावरण शुध्द हवे असे प्रत्येकालाच
वाटते. त्यात प्राणवायू जास्त असणे जरुरी
आहे. हा प्राणवायू झाडे सोडतात. त्यामुळे
झाडे जास्त तर प्राणवायू जास्त. प्राणवायू
जास्त तर रोगराई कमी  हे गणित दिसते.

● झाडांना महत्त्व  :-
झाडांना महत्त्व देण्याचे कारणही तसेच आहे.  हवेतील वाढणाऱ्या अफाट कर्बद्विवायू शोषण
झाडे करतात. हवेत प्राणवायू सोडतात.

● झाडे काय करतात ? :-
-- झाडे अनेक प्रकारे प्रदूषण नियंत्रण
करतात.
(१)प्रदूषित हवेत शुध्द हवा मिसळतात.
त्यामुळे हवेचा विषारीपणा कमी होतो.

(२)अनेक विषारी कण पानातून, खोडातून
व मुळ्यातून झाडाव्दारे पकडून ठेवले
जातात.

(३)झाडाव्दारे अनेक सुगंध व कीटकनाशक
  द्रव्ये हवेत सोडली जातात.

(४)वातावरणातील तापमानाची तीव्रता
    झाडामुळे कमी होते. थंड हवा उत्साह
"   वाढवते.
   थोडक्यात काय तर झाडं ही प्रदूषण
नियंत्रक आहेत. ते मानवाचे संरक्षक
आहेत. त्यांना आपण जपल्यास ते
आपले अनेक रोगांपासून संरक्षण करतील.

  संकलन :- शंकर सिताराम चौरे(प्रा.शिक्षक)
        जि.प प्रा.शाळा बांडीकुहेर
        ता.साक्री जि.धुळे
        📞 ९४२२७३६७७५

Thursday, 6 April 2017

Listen and answer.

        🔹 Listen and answer.🔹
                   (Yes , No )

✍Shankar chaure  (Pimpalner)
       ¤ 9422736775 ¤

(1) Is a crow pink  ?
Ans -- No .

(2) Is a tiger green  ?
Ans  -- No .

(3) Is a parrot green  ?
Ans -- Yes.

(4) Is the sun cold  ?
Ans  -- No .

(5) Is a  snail  slow  ?
Ans  -- Yes .

(6) Is sugar sweet  ?
Ans -- Yes .

(7) Do lions  fly  ?
Ans  -- No.

(8) Do  tiger sing  ?
Ans -- No.

(9) Is  cat  pet animal  ?
Ans -- Yes.

(10) Is  sunflower  yellow  ?
Ans -- Yes.

(11) Is  honey  bitter  ?
Ans -- No

(12) Is  salt  sweet  ?
Ans -- No

(13) Is  milk  white  ?
Ans -- Yes.

-----------------------------------------------
© शंकर  सिताराम चौरे (प्रा.शिक्षक)
   जि.प प्रा.शाळा बांडीकुहेर
    ता.साक्री जि.धुळे
   📞  9422736775