माझ्या ब्लॉगवर मी श्री.शंकर चौरे आपले स्वागत करत आहे,ब्लॉग अपडेट करण्याचे काम चालू आहे..

ब्लॉग भेटी.

Tuesday, 9 April 2019

चला मराठी - हिंदी - इंग्रजी शिकूया  !

        ( भाग - २)

  चेंडू मराठीत
  गेंद हिंदीत
  इंग्रजीत म्हणतात बाॅल  (ball )
  भिंत मराठीत
  दीवार हिंदीत
  इंग्रजीत म्हणतात वाॅल  ( wall )

  टेकडी मराठीत
  पहाडी हिंदीत
  इंग्रजीत म्हणतात हिल (hill )
  पडणे मराठीत
  गिरणे हिंदीत
  इंग्रजीत म्हणतात फाॅल  (  fall )

  लेखणी मराठीत
  कलम हिंदीत
  इंग्रजीत म्हणतात पेन  (pen )
  कोंबडी मराठीत
  मुर्गी  हिंदीत
  इंग्रजीत म्हणतात  हेन  ( hen )

  माणूस मराठीत
  आदमी हिंदीत
  इंग्रजीत म्हणतात मॅन  ( man )
  दहा मराठीत
  दस हिंदीत
  इंग्रजीत म्हणतात टेन  (ten )

  पाऊस मराठीत
  बारिश हिंदीत
  इंग्रजीत म्हणतात रेन  ( rain )
  मेंदू मराठीत
  भेजा हिंदीत
  इंग्रजीत म्हणतात ब्रेन  ( brain )

  मांजर मराठीत
  बिली हिंदीत
  इंग्रजीत म्हणतात कॅट  ( cat )
  उंदीर मराठीत
  चूहा हिंदीत
  इंग्रजीत म्हणतात रॅट  ( rat )

  झोपडी मराठीत
  कूटी हिंदीत
  इंग्रजीत म्हणतात हट  ( hut )
  कापणे मराठीत
  काटना हिंदीत
  इंग्रजीत म्हणतात कट  (cut )

  आई  मराठीत
  माॅ हिंदीत
  इंग्रजीत म्हणतात मदर  (mother )
  वडिल मराठीत
  पिता हिंदीत
  इंग्रजीत म्हणतात फादर ( father )

  भाऊ मराठीत
  भैय्या हिंदीत
  इंग्रजीत म्हणतात ब्रदर  ( brother )
 बहिण मराठीत
  बहन हिंदीत
  इंग्रजीत म्हणतात सिस्टर  ( sister )

  सूर्य मराठीत
  सूरज  हिंदीत
  इंग्रजीत म्हणतात सन  ( sun )
  पळणे  मराठीत
  भागणे  हिंदीत
  इंग्रजीत म्हणतात रन  ( run   )

  समुद्र मराठीत
  सागर हिंदीत
  इंग्रजीत म्हणतात  सी  ( sea )
  चहा मराठीत
  चाय हिंदीत
  इंग्रजीत म्हणतात टी ( tea )
 
  लेखक :- शंकर सिताराम चौरे  (प्रा. शिक्षक )
                पिंपळनेर ता. साक्री जिल्हा धुळे
                ९४२२७३६७७५
 
 
 

Monday, 8 April 2019

पाणी ( पाणी म्हणजे जीवन  ! )

      पृथ्वीचा सुमारे ७१ % भाग हा
 पाण्याने व्यापला आहे. समुद्राचे पाणी खारट
असल्याने ते पिण्यासाठी आणि शेतीसाठी
उपयुक्त नसते. नदी, नाले, ओहळ इत्यादींचे
वाहते पाणी जमिनीत मुरते आणि त्यामुळे
जमिनीखाली पाण्याचे स्रोत तयार होतात.
अशा पाण्याला भू - जल म्हणतात.

     विहीर, कूपनलिका, तलाव, नदी हे सर्व पाण्याचे स्रोत आहेत.
  
   ● पाण्याची रूपे  :-
       पृथ्वीवर पाणी तीन अवस्थांमध्ये असते.
विहीर, तलाव, नदी, समुद्र तसेच जमिनीखाली
पाणी द्रवरूपात असते.

      उंच पर्वतांवर बर्फाच्या म्हणजेच स्थायुरूपात पाणी सापडते.

    हवेत वायुरूपात पाणी असते.
    तापमानानुसार पाण्याचे अवस्थांतर घडून
येते.  ० ° से ला (शून्य अंश सेल्सिअसला)
बर्फाचे पाण्यात म्हणजेच स्थायूचे द्रवात, तर
१०० ° से ला पाण्याचे वाफेत म्हणजेच द्रवाचे
वायुरूप अवस्थांतर होते.
        पाण्याचे बाष्पीभवन कोणत्याही
तापमानाला होऊ शकते. उच्च तापमानावर
बाष्पीभवन वेगाने होते.

 ● जलप्रदूषण --
   जमिनीवरून वाहणाऱ्या पाण्यात सांडपाणी
किंवा रासायनिक पदार्थ मिसळले, तर ते
पिण्यायोग्य राहत नाही. विशेषतः उद्योगधंद्यात
वापरलेले पाणी जवळपासच्या पाण्याच्या
स्त्रोतात जसेच्या तसे सोडले जाते. त्यामुळे
दूषित होते. याला जलप्रदूषण म्हणतात.
   पृथ्वीचा सुमारे तीन चतुर्थांश भाग पाण्याने
व्यापला असला, तरीही फक्त तीनच टक्केच
पाणी पिण्यासाठी किंवा इतर उपयोगांसाठी
वापरता येते. पाणी ही एक मौल्यवान नैसर्गिक
संपत्ती आहे.  तिचा वापर फारच काळजीपूर्वक
करणे गरजेचे आहे. पाण्याची टंचाई दूर
करण्यासाठी जलव्यवस्थापन करणे गरजेचे
आहे.

संकलन :- शंकर सिताराम चौरे  (प्रा. शिक्षक )
             पिंपळनेर ता. साक्री जिल्हा धुळे
             ९४२२७३६७७५

Saturday, 6 April 2019

सामान्यज्ञान  (भारतीय ऐतिहासिक घडामोडी )

(१) कोणत्या संख्यांचा वापर भारतीयांनी प्रथम केला  ?

--- १ ते ९ हे अंक व  ० ही संख्या यांचा
     वापर भारतीयांनी प्रथम केला.
------------------------------------------------

(२) कोणत्या गणिती संकल्पनेचा शोध भारतीयांनी लावला  ?

---  ० ते ९ या अंकांची एकं,  दहं  अशा
    स्थानानुसार किंमत बदलते, या गणिती
    संकल्पनेचा शोध भारतीयांनी लावला.
-------------------------------------------------

(३) खगोलशास्त्रातील कोणती बाब आर्यभटाने सांगितली ?

---  पृथ्वी सूर्याभोवती फिरते, ही खगोलशास्त्रीय
     बाब आर्यभटाने सांगितली.
--------------------------------------------------

(४) प्राचीन भारतात कोणत्या धातूंपासून  मूर्ती घडवत असत  ?

-- प्राचीन भारतात तांबे व कांस्य या धातूंपासून मूर्ती घडवत असत.
--------------------------------------------------

(५) कोणती जगप्रसिद्ध महाकाव्ये संस्कृत
     साहित्यात निर्माण झाली  ?

--- 'रामायण ' व  ' महाभारत ' ही जगप्रसिद्ध
    महाकाव्य संस्कृत साहित्यात निर्माण झाली.
    
संकलन :- शंकर सिताराम चौरे  (प्रा. शिक्षक )
             पिंपळनेर ता. साक्री जिल्हा धुळे
             ९४२२७३६७७५